रत्नागिरी हा कोकणातील जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला असून पूर्वेला सह्याद्रीची मुख्य रांग दक्षिणोत्तर गेलेली आहे. सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या अरबी समुद्राला या डोंगर रांगा जेथे मिळतात, तेथे खाडय़ा निर्माण झाल्या. या खाडय़ामुळे कोकणचा किनारा दंतूर झालेला आहे. या दंतूर किणाऱ्यामुळे कोकणचे निसर्गसौंदर्य कैक पटीने वाढले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगड नावाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.