५० वर्षापूर्वीचा काळ . . . सात ध्येयवेडयांनी एका वेगळया धुंदीत एक साहस केलं. त्याचं नाव ‘जीवन विकास’ भवितव्याची, यशापयशाची पर्वा न करता अक्षरश: घरावर तुळशीपत्र ठेवलं. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, कर्मवीर नामदार दादासाहेब कन्नमवार यांच्या कृपाप्रसादाने शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यात, जनमानसात असलेली या स्वप्नवेडयांची प्रतिमा कामी आली. भरघोस पाठिंबा मिळाला, आणि सुरू झाले विविध उपक्रम-शालेय व सहशालेय.
लवकरच निर्माण झाली पंरपरा - शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकण्याची, विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याची आणि संस्कारित पुढची पिढी निर्मितीची . . .