"eDistrict" प्रकल्पाचा मुख्य उद्धेश हा शासनाकडून, नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा संगणकीकृत-ऑनलाईन(electronically) पद्धतीने उपलब्ध करून देणे आहे. नागरिकांना शासना मार्फत देण्यात येणारे विविध आवश्यक दाखले, परवाने अत्यंत प्रभावी व पारदर्शक पणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'eDistrict' प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यास सुरवात केलेली आहे.
या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमतः रत्नागिरी तालूक्यातील सर्व सरकारमान्य महा ई- सेवा केंद्रांमधून ही सेवा उपलब्ध आहे. उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये लवकरात लवकर ही सेवा उपलब्ध करण्याचे काम चालू आहे.