कोपरगाव- उद्योगविश्व
आज कोपरगाव एका नव्या वळणावर येवून ठेपलंय,इथून पुढे जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी इथील तरूणांना स्वतःची ओळख करून द्यावी लागणार आहे .आणि जगाला सांगावे लागणार आहे कि कोपरगावकर सुद्धा नव्या व्यवसायात यश प्राप्त करू शकतात.कोपरगावला हवी आहे नवी ओळख आणि उद्योगविश्वात एक जागा ती देखील मानाची ,नाविन्याची,कल्पकतेची.....
कोपरगाव,महाराष्ट्रातील एक तालुक्याचा गाव ..सन १९२५ च्या काळातील राज्यातील एक गुळाची भव्य बाजारपेठ.शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आणि व्यापारीही .त्या मुळे तालुक्याचा विकास झाला तो गोदावरी नदीच्या साथीने,इथली शेती बहरली,ती ऊसाचा पिकांनी.आणि इथला शेतकरी राजा त्या काळात खर्या अर्थाने संपन्न झाला. एके काळी कलीफोर्निया नावाने ओळखला जाणारा हा परिसर आज जगाच्या स्पर्धेत जरासा मागे पडलाय ...नवी नवी क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी इथल्या जनतेस आपल्या सारखे नवीन उद्योजक माहिती पाहिजे .त्यासाठी आम्ही घेवून आलो आहोत हे नवीन दालन (फेसबुक) जिथे आपल्याला भेटतील नवे आपल्यासारखीच कल्पक उद्योजक जे आपल्याला सांगतील यशोगाथा,आणि तुम्ही पण मन मोकळे करा आपल्या मित्रांबरोबर.... नवनवीन कल्पना द्या ,काही कल्पना घ्या..आणि यशस्वी उद्योजक होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका..