वारकरी सांप्रदायात अनेक प्रासादिक फड परंपरा आहेत..त्या परंपरा अत्यंत चांगल्या प्रकारे जोपासत आहे.पंढरीत.चातुर्मासात गाथा प्रवचन,ज्ञानेश्वरी प्रवचन,भजन इ.अशा परंपरा ऐकल्या असतील पण प्रसिध्दी पासून काहीशी दूर असलेली ही थोरली परंपरा अर्थात सद्गुरुविठोबा दादामहाराज चातुर्मास्ये पंरपरा ........पंढरीश परत्माच्या आज्ञेने सद्गुरू दादामहाराजांनी सुरु केली..प.पू.महाराजांचे चार महिने पंढरीत वास्तव्य,सकाळी काकडा-भजन, श्रीमद्भागवत कथा,हरीपाठ व सायं.कीर्तनसेवा ....चातुर्मास संपल्या नंतर 'पिटू भक्तिचा डागोंरा' म्हणत गावोंगावी कीर्तन,भजन इ.कार्यक्रम..तसेच माघ शु.दशमी ते माघ शु.
त्रयोदशी श्रीक्षेत्र अनवा येथे उत्सव....दशमीला पालखी...एकादशीला भगवान परमात्माची रथातून मिरवणूक .....त्रयोदशी ला पावनी नदीच्या तिरी सद्गुरु दादामहाराजांच्या समाधी समोर काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता...संस्थानचे विद्यमान पिठाधिश प.पू.श्रीगुरु ज्ञानेश्वरमाऊली महाराज चातुर्मास्ये ( सद्गुरुदादामहाराजांचे ११ वे वंशज) हि असणारी श्रेष्ठ दिव्य परंपरा अव्याहत पणे सांभाळत आहे.....या पेज च्या माध्यामातून संस्थानचे कार्यक्रम,माहीती,उत्सव इ.ची अपडेप मिळतील.. श्रीविठ्ठल