नैसर्गिक सौंदर्यासोबतच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरास जगात आशिया खंडात वेगाने विकसित होणारे शहर, दरवाजांचे शहर, संतांची भूमी आणि एकाच दिवशी १५० मर्सिडीज कार घेणाऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.
येथे महाराष्ट्रातील तीन जागतिक वारसा ठिकाणांपैकी दोन जागतिक वारसा ठिकाणे वेरूळ आणि अजिंठा लेण्या, १२ ज्योतिर्लिंगानपैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, दौलताबादचा अजिंक्य किल्ला, तेथे असलेली यादवकालीन मेँढा तोफ भारतातील 2 री मोठी तोफ असुन वजन 14 टन, 6 मीटर लांब,पल्ला 9 Km आहे. ही तोफ अफगानिस्थान वरून मागवण्यात आली होती, दख्खनेतील ताज म्हणून ओळखला जाणारा बीबीचा मकबरा, पैठण येथील संत एकनाथ महाराजांची समाधी, आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे जायकवाडी धरण, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणी आणि हिमरू साडी, पाण्याच्या दबावावर चालणारी पाणचक्की, औरंगजेबची कबर, औरंगाबादच्या लेण्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, निजामकालीन दरवाजे, म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण, गौताळा अभयारण्य, आशियातील सर्वात मोठे प्रोझोन शोप्पिंग मौल इत्यादी पर्यटनीय स्थळे आहेत.
अशा या अद्वितीय औरंगाबाद शहराविषयी सर्व मराठी मनाला आमची ही मराठमोळी भेट.