साईबाबा हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री साईबाबा शिर्डीत आले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील श्वानकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले. साईबाबांनी आपल्या श्वान कार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिले होते कि, देहत्यागा नंतर माझी हाडे समाधितून बोलतील व या ठिकाणी माणसांची रिघ लागेल. याचा प्रत्यय आजही येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. १५ आक्टोबर १९१८ साली दसर्याच्या दिवशी श्री साईबाबांचा मृत्यु झाला.
साईबाबा शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही. साईबाबा पुढे सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवण दिली.'सबका मालीक एक'हे साईचे बोल होते.श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जगाला दिला.