***** बागलाणचा इतिहास *****
सर्व श्रद्धांचे एक मूर्त स्वरूप राजे श्री शिवछत्रपती यांनी हिंदवी
स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य बांधणीच्या घडामोडींमध्ये
बागलाणदेखील मराठेशाहीच्या पर्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती
शिवरायांनी सह्याद्रीच्या कुशीतील डोंगर दऱ्यामध्ये गड,कोट,किल्ले,
यांची निर्मिती केली. अशाच सर्व मराठमोळ्या अस्मितेच एक
महत्त्वपुर्ण प्रतिक म्हणुन बागलाण मधील साल्हेर मुल्हेर इथल्या
किल्ल्यांना महत्त्व आहे. इ.सन १६६४ ते १६७० या वर्षी श्री
छत्रपती शिवाजी महाराजांचा बागलाणशी आधिक संबध आला.
याच भूमीवर झालेला मोगल मराठी यांच्यातील कांचनमांचनच्या
बारीतील मराठ्यांचा विजय हा इतिहास प्रसिद्ध आहे. स्वराज्य
घडवुन स्वतःच व राज्याच रक्षण करणाऱ्या या युगपुरुषाचा स्पर्श
बागलाणच्या भूमिला झाला.